राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बारामतीतील एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली आहे. सरकारने कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती आयकर (इन्कम टॅक्स) विभागाकडून मागवली असून, ही माहिती प्राप्त झाल्यानंतरच कर्जमाफीची अंतिम प्रक्रिया राबवली जाईल. सरकारच्या निकषानुसार, जे शेतकरी आयकर भरतात त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल की नाही यावर […]
नसरापूरातील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी
नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. हा गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि समाजाच्या सामूहिक विवेकाला हादरवणारा असल्याचे न्यायालयाने नमूद केले. निर्णयात आरोपीचा गुन्हेगारी इतिहास, पीडितेवरील अमानुष अत्याचार, निर्घृण हत्या आणि पश्चात्तापाचा अभाव यांचा उल्लेख करण्यात आला. आरोपीच्या बाजूने शिक्षा कमी करण्यासारखी कोणतीही परिस्थिती नसल्याचे […]
गोकुळ गितेंचा शिवसेना प्रवेश ‘वेटिंग’वर? ऐनवेळी कार्यक्रम स्थगित
नाशिकचे नेते गोकुळ गिते यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाबाबत ऐनवेळी मोठा ट्विस्ट आला आहे. विशेष विमानाने मुंबईत दाखल झालेल्या गिते यांचा पक्षप्रवेश सध्या ‘वेटिंग’वर ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज सायंकाळी 6.15 वाजता बाळासाहेब भवन येथे गिते यांचा पक्षप्रवेश होणार होता. त्यानंतर कार्यक्रमाची वेळ बदलून 7.15 वाजता नंदनवन येथे प्रवेश होणार असल्याचे पक्षाकडून […]
बारामतीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा; नगरपालिकेचा मोठा निर्णय
बारामती : एल निनोच्या प्रभावामुळे कमी झालेला पाऊस, घटलेले जलसाठे आणि नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद असल्याने बारामती शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बारामती नगरपरिषदेकडून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शहरातील विविध भागांना ठराविक दिवशी पाणीपुरवठा केला जाणार असून पुढील आदेशापर्यंत हे नियोजन लागू राहणार […]
परभणीत हनुमान मंदिरातील सभामंडप कोसळला; 7 भाविकांनी जीव गमावला तर 30 हून अधिक जखमी
परभणी जिल्ह्यातील यशवडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात शनिवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. मंदिर परिसरातील सभामंडप अचानक कोसळल्याने 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना मोठ्या संख्येने भाविक सभामंडपात उपस्थित होते. याचवेळी मंडपाचा काही भाग अचानक कोसळला. दुर्घटनेनंतर […]
शिंदे गटात सामील होणार का? अखेर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मौन सोडलं…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच त्यांनी अखेर याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, राजकीय निर्णयाबाबत त्यांनी अद्याप कोणतेही संकेत दिले नसून अंतिम निर्णय मतदारसंघातील जनतेशी चर्चा केल्यानंतरच जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “मी माझ्या मतदारसंघातील […]
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
राज्यातील गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातील माफीचा साक्षीदार म्हणून सादर करण्यात आलेल्या व्यक्तीची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. तसेच, आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले ठोस आणि निर्विवाद पुरावे तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आले नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने आपल्या निकालात नमूद […]
राष्ट्रवादीची घोषणा! सुनेत्रा पवारांच्या जागी राजेंद्र जैन यांना संधी
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राजेंद्र जैन यांना संधी; राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी पक्षाने अखेर उमेदवाराची घोषणा केली आहे. राज्यसभा सदस्य झाल्यानंतर रिक्त झालेल्या सुनेत्रा पवार यांच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी ही अधिकृत घोषणा केली. राजेंद्र जैन हे पक्षाचे […]
स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात बारामती बसस्थानकाची बाजी…
बारामती बसस्थानकाने राज्यातील ‘अ’ वर्ग बसस्थानकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात’ १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वच्छता, शिस्त आणि टापटीपपणाच्या संकल्पनांना साकार करणाऱ्या या कामगिरीमुळे बारामतीचा राज्यभर गौरव झाला आहे. या यशानंतर सोशल मीडियावर अनेकांकडून या कामगिरीचे श्रेय स्व. माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना दिले […]
प्रेमात धोका ते IAS पर्यंतचा प्रवास: आदित्य पांडे यांची प्रेरणादायी कहाणी
बिहारच्या आदित्य पांडे यांची कहाणी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेले आदित्य दहावीत असताना प्रेमात पडले आणि त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर झाला. अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांच्या गुणांमध्ये मोठी घसरण झाली. पुढे त्यांनी वडिलांच्या इच्छेखातर इंजिनिअरिंग पूर्ण केले, पण त्यांचे मन त्या क्षेत्रात रमत नव्हते. ज्या मुलीसाठी त्यांनी सर्वस्व दिलं, तिच्याचकडून त्यांना धोका […]










